जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद
four-cattle-thieves-arrested-in-aurangabad-and-jalna-rural-area
औरंगाबाद: जालना आणि औरंगाबादमधील ग्रामीण भागात बैलांसारख्या जनावरांची चोरी करुन त्यांची मांसाकरिता विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या (Aurangabad crime branch team) पथकाला यश आले आहे. या टोळीकडून 50,000 रुपये रोख, 28,000 रुपये किंमतीचे 3 मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालना आणि औरंगाबादमधील ग्रामीण भागात जनावरे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून पोलिस या जनावर चोरांच्या मागावर होते. विशेष म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी ही कारवाई झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिवारात उभ्या बैलांची केली तस्करी
करमाड पोलिस ठाण्यात भागवत साळुंके नामक तरुणाने ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लालवाडी शिवारात बैलजोडी बांधली होती. या जोडीची 20,000 रुपये होती. तसेच त्यांच्या बाजूच्या शिवारात शेख अहेमद शेख महम्मद यांचीही 20,000 रुपये रुपये किंमतीची एक जोडी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्यांची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली असता गुप्त बातमीदारांकडून गुन्हेगारांची माहिती मिळाली.
